वट पौर्णिमा केव्हा आहे2025 ? जाणून घ्या तिथी, महत्व आणि शुभ मुहूर्त

वट पौर्णिमा केव्हा आहे? जाणून घ्या तिथी, महत्व आणि शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते.
वटसावित्री पौर्णिमा साजरी करण्याचे धार्मिक महत्व आहे.
पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून परत मिळवले होते.
त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घायूसाठी यादिवशी वडाची पूजा करतात.
पाहुयात यंदाची वटपौर्णिमा केव्हा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


जाणून घेऊयात तिथी, शुभ मुहूर्त आणि वटपौर्णिमेचे महत्व काय आहे.

सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ मासातील पौर्णिमेचा, त्यामुळे यादिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो.
विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात.


यादिवशी व्रत करण्याला अत्यंत महत्व आहे.
असे म्हणतात यादिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साताजन्मासाठी मिळतो.
तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते अशी देखील मान्यता आहे.
त्यामुळे पाहुयात कसे करावे, शुभ मुहूर्त काय आहे जाणून घेऊयात तिथी आणि वेळ….

वट पौर्णिमा 2025 : तारीख आणि वेळ

वट पौर्णिमा तारीख : १० जून २०२५*
वट पौर्णिमा तिथी सुरू : सकाळी ११:३५ वाजता
पौर्णिमा तिथी संपते: ११ जून दुपारी १:१३ वाजता

वट पौर्णिमा शुभ मुहूर्त

वट पौर्णिमा केव्हा आहे : वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त : सकाळी ११:५५ ते दुपारी १२:५१ पर्यंत
या दिवशी ब्रह्म मुहूर्तापासून पूजा विधी सुरू करणे शुभ मानले जाते.
पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ शुभ आहे.

वट पौर्णिमा पूजा कशी करावी

वट पौर्णिमा केव्हा आहे : वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी. यादिवशी व्रत करावा.
यानंतर त्यांनी वडपुजेची तयारी करावी.
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याचे धार्मिक महत्व आहे.
त्यामुळे वडपुजेसाठी धूप,दीप,अगरबत्ती,हार.फुले, पाच फळे मुख्यतः आंबा, सुवासिनीच्या शृंगाराचे सामान, वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचे सामान तयार ठेवावे.
वडपुजेचा मुहूर्त पाहून वडाची पूजा करावी.
यावेळी सुवासिनींनी साज शृंगार करावा.
सोळा शृंगार करून भरजरी साडी किंवा लग्नातील शालू यावेळी विवाहित महिला परिधान करतात.
हातभार बांगड्या,कपाळी टिकली भांगेत कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडव्या आणि पैंजण असा साजशृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे.

>>> आयुष्मान कार्डवर मोफत उपचार कोणत्या रुग्णालयात मिळतो? संपूर्ण माहिती एक क्लिकमध्ये!

व्रत कसे करावे

वट पौर्णिमा केव्हा आहे : सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्याने विवाहित स्त्रिया यादिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात.
हा व्रत अनेकजणी निर्जल ठेवतात.
तर काहीजणी एकभुक्त राहून व्रत करतात.
हिंदू रितीनुसार यादिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावा, वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावा.
तसेच काहीजणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर व्रत सोडतात.

वटपौर्णिमा महत्व

पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते.
विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन साताजन्मासाठी पतीपत्नी पवित्र बंधनात बांधले जातात.
पौराणिक कथेनुसार,ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले.
आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले.
त्यामुळे सुवासिनीच्या प्रेमात, तिच्या मंगळसूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले.
याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात.
वट पौर्णिमा केव्हा आहे : यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यांवर राहते अशी देखील मान्यता आहे.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे