Hingoli : शेतकरी गंभीर जखमी, उपचारासाठी लक्ष्मी लाईफ केअर रुग्णालयात दाखल

Hingoli

Hingoli : हिंगोली जिल्ह्यातील डिग्रसवाणी शिवारात एक भीतीदायक घटना घडली आहे, ज्यामध्ये रानडुकराने एका शेतकऱ्याला हल्ला केला. शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ उपचारासाठी लक्ष्मी लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

माहितीनुसार, शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना अचानक रानडुकरा त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यात शेतकऱ्याच्या अंगावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या. त्याला स्थानिकांनी त्वरित रुग्णालयात आणले आणि त्याच्या प्रकृतीवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी त्याच्या जखमांची गंभीरता सांगितली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

रानडुकरांचे हल्ले हे नियमितपणे वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने यावर तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने अधिक कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी या घटनेमुळे जोर धरली आहे.

डिग्रसवाणी शिवारात घडलेली ही घटना शेतकऱ्यांसाठी एक मोठा धक्का ठरली आहे. शेतकऱ्यांना सुरक्षितता आणि संरक्षण प्रदान करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पाऊले उचलावीत, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

Farmer Loan waiver : राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा: कर्जमाफीचा निर्णय लवकरच

Farmer Loan waiver

Farmer Loan waiver : दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींसह हमीभावाच्या प्रतीक्षेतील शेतकरी सध्या अडचणीत असल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या राज्यातील एक कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बॅंकांचे कर्ज थकलेले आहे. त्या शेतकऱ्यांकडे विविध बॅंकांचे ३० हजार ४९५ कोटींचे कर्ज थकीत असल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

Farmer Loan waiver : सध्या बॅंकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना कारवाईच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. वसुलीसाठी बॅंकांचे अधिकारी देखील थकबाकीदार शेतकऱ्यांचा दरवाजा ठोठावत आहेत. दुसरीकडे खासगी सावकारांकडूनही तगादा सुरु आहे. अशा परिस्थितीत अडचणीतील बळिराजा संकटाच्या चक्रव्युवहात सापडला असून राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या होत असल्याचे मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीतून समोर आले आहे.

शेतकरी कर्जमाफी होणार ?

Farmer Loan waiver : महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या प्रचारात बोलताना महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देईल, अशी ग्वाही दिली. तर महाविकास आघाडी सरकारने देखील त्यांच्या वचननाम्यात तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. त्या निर्णयामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर हटणार आहे.

शेतकरी थकबाकीची स्थिती

>>>> येथे क्लिक करा <<<<

Land map : जमिनीचा नकाशा: डिजिटल युगात शोधा

Land map

Land map : शेत जमिनीचा नकाशा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या अधिकृत वेबसाइटवर (mahabhumi.gov.in) जावे लागेल..

वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला त्या वेबसाईटचे होम पेज दिसेल जिथे तुम्हाला एक टेबल दिसेल (प्रीमियम सर्व्हिसेस) ज्यामध्ये तीन नंबरचा पर्याय असेल महाभुनकाशा (जमीन नोंदी असलेले नकाशे) तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला एक पर्याय दिसेल (Location) ज्यामध्ये तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे.

Land map : तुम्हाला दोन पर्याय दिले जातील (ग्रामीण, शहरी) जर तुम्ही शेतकरी किंवा ग्रामीण भागातील व्यक्ती असाल तर तुम्हाला ग्रामीण पर्याय निवडायचा आहे.

जर तुम्ही शहरी व्यक्ती असाल तर तुम्हाला हा अर्बन पर्याय निवडायचा आहे.

त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा आणि तालुका निवडावा लागेल.

तुमच्या गावाचे नाव निवडावे लागेल आणि निवडल्यानंतर तुम्हाला या पर्यायावर (गाव) क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या निवडलेल्या गावाचा संपूर्ण शेतजमिनीचा नकाशा दिसेल.

त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या गट क्रमांकानुसार तुमच्या शेतजमिनीचा नकाशा पाहू शकता.

हेही वाचा : लाडक्या बहिणींना अन्याय! पैसे कापणाऱ्या बँकांवर कारवाईची मागणी


हेही वाचा : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी?

हेही वाचा : बांधकाम कामगारांसाठी सरकारी योजनांचा लाभ घ्या: नोंदणी कशी करावी?

Fertilizer and Seed Business : खत आणि बियाणांचा व्यवसाय, फक्त करा ‘हा ‘ 15 दिवसांचा कोर्स

Fertilizer and Seed Business

Fertilizer and Seed Business : देशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने नुकतेच खत आणि बियाणे उद्योगाला चालना देण्यासाठी नियमांमध्ये बदल करुन रोजगाराच्या संधींना चालना दिली आहे. आता दहावी पास तरुणांनाही खत-बियाणे व्यवसाय करण्याची संधी मिळत आहे. यासाठी सरकारने 15 दिवसांचा कोर्स केला आहे. तो कोर्स पूर्ण केल्यानंतर तरुणांना खत आणि बियाणांचे दुकान सुरु करता येणार आहे.

Fertilizer and Seed Business : 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं

खत आणि बियाणे विकण्याच्या व्यवसायात काम करण्यासाठी आधी बीएस्सी इन ॲग्रिकल्चर किंवा डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर असणे आवश्यक होते, परंतु आता 10वी उत्तीर्ण लोक देखील कीटकनाशके आणि खते आणि बियाणे यांचा व्यवसाय करु शकतात.

हा १५ दिवसांचा कोर्स करावा लागेल
>>> येथे क्लिक करा <<<

PM Kisan Yojana : शेतकरी सन्मान निधी योजनेत नाव आहे का? हे कसे तपासावे?

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : देशभरातल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्माम निधी योजना लागू केलेली आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी चार महिन्यांच्या अंतराने 2000 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाते.

हे ही वाचा : खासदार म्हणजे कोण, तो काय काम करतो?समजून घ्या…

PM Kisan Yojana : 17 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार
लाभार्थी यादीत नाव आहे की नाही हे तपासा
>>>>येथे क्लिक करा <<<

Bail Pola :आज सर्जा-राजाचा सण पोळा, शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण

WhatsApp Image 2023 09 14 at 2.43.46 PM

…🐂आज राजा हा पोळ्याचा🐂…
राजा खराखुरा बैल
बळी राजाच्या मळ्याचा
सण आला सण आला
आज त्याचाही पोळ्याचा॥धृ॥
गळा मानपान देऊ
नव्या घुंगर माळांचा
देऊ श्रावण मासात
घास पुरण पोळ्यांचा ॥१॥
बारा महिन्यात आला
सण त्याचा सोहळ्याचा
शिंगे रंगवून पायी
नाद घुंगरवाळ्याचा॥२॥
शोभिवंत बैल होई
आज एकेक पोळ्याचा
झाला शृंगार पुरता
शोभे राजा हा पोळ्याचा॥३॥
सण त्याचा एक दिन
असा येतो सोहळ्याचा
सर्जा राजा सालभर
आज राजा हा पोळ्याचा॥४॥
🐂🐂

हे पण वाचा ->> Maratha Aarakshan : “मराठा आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील, ‘तो’ व्हिडीओ फिरवणं…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

नागपूर – देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले क्षेत्र म्हणजे कृषीक्षेत्र होय. या क्षेत्राचा प्रमुख भारवाहक आहे तो सर्जा-राजा! शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावत बाराही महिने शेतात राबणारा बळीराजाचा सखासोबती म्हणजे बैल. याच बैलाच्या बळावर शेतकरी घरी, अंगणी धान्याच्या राशी लावतो. त्याच्याप्रती आभार, ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा होय.

गुरूवारी(ता. १४) शहरासह ग्रामीण भागात पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात दरवर्षी पिठोरी अमावस्येला पोळा सण येतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पोळा हा सण अविभाज्य अंग आहे. आठवड्याभरापासूनच शेतकऱ्यांना पोळ्याचे वेध लागतात. त्याच्या शृंगारासाठी साहित्य खरेदीसाठी बाजार सजलेले असतात. साजशृंगार खरेदीची लगबग सुरू असते. लहान, थोरांपासून घरातील सर्वच सदस्य उत्साही असतात. पोळ्याच्या दिवशी तोरणाखाली उभा असतानाच आपला सर्जाराजा उठून दिसावा यासाठी शेतकरी त्याला सजवत असतो.

बैलाची अंघोळ आणि खांदामळणी

बाराही महिने शेतीची अवजारे आणि बैलगाडी वाहून नेल्याने बैलाचे खांदे कडक होतात. काही बैलांच्या खांद्यांना चिरेही पडतात. त्यांना कदाचित वेदना होत असतील तर पण सांगू शकत नाहीत. शेतकरी बैलाच्या वेदना जाणतो.

पोळा सणाच्या काळात बैलाला आराम दिल्या जातो. सकाळी त्याला गावातील नदी, विहिरी अथवा तलावावर नेऊन साबण, उटणे लावत आंघोळ घालतात. दुपारी त्याला चारा दिल्यानंतर आराम देतात.

सायंकाळच्या सुमारास खांदा मळणीची तयारी सुरू होते. बैलाच्या खांद्यावर तूप, हळद चोळून त्याला मुलायम केल्या जाते. तत्पूर्वी गरम पाण्याने खांदा शेकल्या जाते. आपआपल्या भागातील प्रथेप्रमाणे कुठे दही, भात व मोळ चोळतात. बैलाच्या अंगावर गेरूचे ठिपके लावतात.

शिंगाना बेगड बांधतात. त्यानंतर गोठ्यात बैलाची पूजा करून औक्षण केल्या जाते. अर्थात त्याची सेवा केली जाते. ‘आजपर्यंत जशी साथ दिली तशीच साथ पुढेही देत राहशील’ अशी साद घातली जाते.

यांत्रिक युगातही महत्व कायम

आजचे युग यात्रिकीकरणाचे आहे. बहुतांश शेतीकामे अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून केली जातात. पण, ‘शेती-शेतकरी-बैल’ हे समीकरण मात्र कायम आहे. गोठ्यात बैल नसले तर शेतकऱ्याला करमत नाही. जी मजा बैलाच्या खांद्यावरील बैलगाडीत बसून शेतात जाण्याने येते ती ट्रॅक्टरने येत नाही. बैलाशी शेतकऱ्याच्या भावना जुळलेल्या आहेत.

हे पण वाचा ->> Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती

PM किसान योजना: PM किसान योजनेतील किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची घोषणा; जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, तर …

WhatsApp Image 2023 07 27 at 3.54.18 AM

PM किसान योजना: PM किसान योजना: PM किसान योजनेतील किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची घोषणा, तुमच्या खात्यात पैसे आले की नाही?

राजस्थानमधील सीकर येथील एका कार्यक्रमात त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवणार असल्याचे सांगितले आहे. 14 वा हप्ता जारी करताना ते म्हणाले की पीएम किसान सन्मान निधी ही जगातील सर्वात मोठी योजना आहे ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात.

14 व्या हप्त्यापर्यंत 2 लाख 60 हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले आहेत.

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला संदेश तपासा.

पीएम किसानचा 14वा हप्ता जारी झाल्यानंतर, योजनेत नोंदणीकृत शेतकर्‍यांच्या खात्यावर 2000 रुपये ट्रान्सफर झाल्याचा संदेश येईल. तुम्ही मिनी स्टेटमेंट किंवा खात्यातील शिल्लक तपासू शकता. तुम्हाला अजूनही संदेश मिळाला नसल्यास, तुम्ही तुमचे मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी किंवा तुमच्या खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी एटीएमला भेट देऊ शकता.

हे ही वाचा : – तलाठी भरतीत ‘सेटिंग’ होणार का? उमेदवारांची मुलाखत घेणे; 19 लाखांचा दर आणि …

याशिवाय पासबुकमध्ये एंट्री करून तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हेही तुम्ही तपासू शकता. नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगद्वारे देखील शिल्लक तपासली जाऊ शकते जर तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग सुविधा वापरत असाल, तर तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक किंवा खाते स्टेटमेंट स्वतः ऑनलाइन देखील तपासू शकता.

याशिवाय तुम्ही तुमच्या बँकेच्या मिस्ड कॉल नंबरवर मिस कॉल देऊन खात्यातील शिल्लक जाणून घेऊ शकता.

पीएम शेतकरी हेल्पलाइन नंबरवर संपर्क करू शकतात


जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, तर तुम्ही PM किसान हेल्पलाइन नंबर १५५२६१, PM किसान लँडलाइन नंबर ०११—२३३८१०९२, २३३८२४०१, PM किसान टोल फ्री नंबर १८००११५५२६६, PM किसान नवीन हेल्पलाइन ०११- २४३००६० किंवा email@kisanic60t. gov.in वर संपर्क करून माहिती मिळवू शकता.

हे ही वाचा : –  शेकऱ्यासाठी खुशखबर : खतांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करण्यात आला

शेकऱ्यासाठी खुशखबर : खतांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करण्यात आला

WhatsApp Image 2023 07 26 at 3.44.45 PM

शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी केंद्र सरकारने 9822446655 हा व्हाट्सअॅप क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर शेतकरी खते मिळत नाहीत, खते खराब आहेत, खतांचे दर जास्त आहेत, खते वितरित करण्यात अडचणी येत आहेत, अशा तक्रारी नोंदवू शकतात.

शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवताना आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, तक्रारीचा विषय आणि तक्रारीची माहिती नक्की देणे आवश्यक आहे. तक्रारीची माहिती मिळाल्यानंतर संबंधित विभाग तक्रारीचा तपास करून कारवाई करेल.

केंद्र सरकारने हा व्हाट्सअॅप क्रमांक सुरू केल्याने शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदवणे सोपे होईल आणि त्यांच्या तक्रारींची त्वरित सुनावणी होईल.

हे ही वाचा : CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाणार? केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं…

शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी व्हाट्सअॅप क्रमांक वापरण्याचे फायदे

  • शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदवणे सोपे होईल.
  • शेतकऱ्यांच्या तक्रारींची त्वरित सुनावणी होईल.
  • शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
  • खतांचे वितरण व्यवस्थित होईल.
  • खते मिळवणे सोपे होईल.
  • खतांचे दर कमी होतील.

शेतकऱ्यांनी खतासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी व्हाट्सअॅप क्रमांक वापरून आपले हक्क मिळवावेत.

Weathar News Update : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; पावसाबाबत हवामान खात्याचा अंदाज

WhatsApp Image 2023 07 09 at 3.49.10 PM

यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. मान्सून तळ कोकणात दाखल झाल्यानंतर आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका हा मान्सूनला बसला.

मान्सूनची गती मंदावली. त्यानंतर बिरपजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूननं महाराष्ट्र व्यापला. यंदा पाऊस उशिरा पडल्यानं पेरणीला देखील उशीर झाला आहे.

मात्र यातच आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा सुमारे 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या मोसमी पावसावर एल निनोचं सावट आहे.

प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती निर्माण झाली आहे. एल निनो स्थितीमुळे मोसमी पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.

राज्यात कुठे पाऊस, कुठे उन, वाचा.. तुमच्या गावात कसे असेल वातावरण?

WhatsApp Image 2023 06 17 at 11.01.40 AM 1

नागपूर : राज्यभरात मान्सूनच्या अनुपस्थितीत काही ठिकाणी तुरळक पाऊस आणि उष्णतेची लाट कायम आहे. मान्सूनचे पुनरागमन होत असताना उष्णतेची लाट उसळते.

मुंबई, कोकणात काही ठिकाणी हलका पाऊस पडतो. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज नंदुरबार, जळगाव, धुळे शहरात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

हे ही वाचा :-Weather alert: राज्यात पुढील 4, 5 दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज जारी

सांगली, सोलापूर, बीड, लातूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे