Bail Pola :आज सर्जा-राजाचा सण पोळा, शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण

WhatsApp Image 2023 09 14 at 2.43.46 PM

…🐂आज राजा हा पोळ्याचा🐂…
राजा खराखुरा बैल
बळी राजाच्या मळ्याचा
सण आला सण आला
आज त्याचाही पोळ्याचा॥धृ॥
गळा मानपान देऊ
नव्या घुंगर माळांचा
देऊ श्रावण मासात
घास पुरण पोळ्यांचा ॥१॥
बारा महिन्यात आला
सण त्याचा सोहळ्याचा
शिंगे रंगवून पायी
नाद घुंगरवाळ्याचा॥२॥
शोभिवंत बैल होई
आज एकेक पोळ्याचा
झाला शृंगार पुरता
शोभे राजा हा पोळ्याचा॥३॥
सण त्याचा एक दिन
असा येतो सोहळ्याचा
सर्जा राजा सालभर
आज राजा हा पोळ्याचा॥४॥
🐂🐂

हे पण वाचा ->> Maratha Aarakshan : “मराठा आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील, ‘तो’ व्हिडीओ फिरवणं…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

नागपूर – देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले क्षेत्र म्हणजे कृषीक्षेत्र होय. या क्षेत्राचा प्रमुख भारवाहक आहे तो सर्जा-राजा! शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावत बाराही महिने शेतात राबणारा बळीराजाचा सखासोबती म्हणजे बैल. याच बैलाच्या बळावर शेतकरी घरी, अंगणी धान्याच्या राशी लावतो. त्याच्याप्रती आभार, ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा होय.

गुरूवारी(ता. १४) शहरासह ग्रामीण भागात पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात दरवर्षी पिठोरी अमावस्येला पोळा सण येतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पोळा हा सण अविभाज्य अंग आहे. आठवड्याभरापासूनच शेतकऱ्यांना पोळ्याचे वेध लागतात. त्याच्या शृंगारासाठी साहित्य खरेदीसाठी बाजार सजलेले असतात. साजशृंगार खरेदीची लगबग सुरू असते. लहान, थोरांपासून घरातील सर्वच सदस्य उत्साही असतात. पोळ्याच्या दिवशी तोरणाखाली उभा असतानाच आपला सर्जाराजा उठून दिसावा यासाठी शेतकरी त्याला सजवत असतो.

बैलाची अंघोळ आणि खांदामळणी

बाराही महिने शेतीची अवजारे आणि बैलगाडी वाहून नेल्याने बैलाचे खांदे कडक होतात. काही बैलांच्या खांद्यांना चिरेही पडतात. त्यांना कदाचित वेदना होत असतील तर पण सांगू शकत नाहीत. शेतकरी बैलाच्या वेदना जाणतो.

पोळा सणाच्या काळात बैलाला आराम दिल्या जातो. सकाळी त्याला गावातील नदी, विहिरी अथवा तलावावर नेऊन साबण, उटणे लावत आंघोळ घालतात. दुपारी त्याला चारा दिल्यानंतर आराम देतात.

सायंकाळच्या सुमारास खांदा मळणीची तयारी सुरू होते. बैलाच्या खांद्यावर तूप, हळद चोळून त्याला मुलायम केल्या जाते. तत्पूर्वी गरम पाण्याने खांदा शेकल्या जाते. आपआपल्या भागातील प्रथेप्रमाणे कुठे दही, भात व मोळ चोळतात. बैलाच्या अंगावर गेरूचे ठिपके लावतात.

शिंगाना बेगड बांधतात. त्यानंतर गोठ्यात बैलाची पूजा करून औक्षण केल्या जाते. अर्थात त्याची सेवा केली जाते. ‘आजपर्यंत जशी साथ दिली तशीच साथ पुढेही देत राहशील’ अशी साद घातली जाते.

यांत्रिक युगातही महत्व कायम

आजचे युग यात्रिकीकरणाचे आहे. बहुतांश शेतीकामे अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून केली जातात. पण, ‘शेती-शेतकरी-बैल’ हे समीकरण मात्र कायम आहे. गोठ्यात बैल नसले तर शेतकऱ्याला करमत नाही. जी मजा बैलाच्या खांद्यावरील बैलगाडीत बसून शेतात जाण्याने येते ती ट्रॅक्टरने येत नाही. बैलाशी शेतकऱ्याच्या भावना जुळलेल्या आहेत.

हे पण वाचा ->> Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती

अखंड विठुनामाच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपुरात भव्य पूजा! विठुरायाला घातलं ‘हे’ साकडं!

WhatsApp Image 2023 06 29 at 10.45.50 AM

पंढरीची भक्ती उत्सव! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा; “अरे” विठुरायाला दिला होता! अखंड विठुनामाच्या गजरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपुरात भव्य पूजा! गेल्या महिनाभरापासून पंढरीच्या विठ्ठुरायाच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या यात्रेकरूंचा जथ्था पंढरपुरात दाखल झाला आणि विठ्ठल-रखुमाईच्या नामस्मरणानेच पंढरी भरली.

विठ्ठलाच्या यात्रेने वारकऱ्यांची मने तृप्त झाली, पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या अडचणी लाडक्या विठुरायाच्या दर्शनापासून दूर झाल्या. पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. या भक्तिरसात न्हालेल्या पंढरपूरच्या मंदिरात पहाटे तीनच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात पावसाला नुकती

च सुरुवात झाली असून, यंदा पाऊस झाला पाहिजे. ते समाधानकारक होवो आणि राज्याचा बळीराजा सुखी होवो, एवढीच मी विठुरायाच्या चरणी प्रार्थना केली. राज्यातील जनता विठुरायाच्या चरणी सुखी-समाधानी राहो, असेही ते म्हणाले. माझा आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न सर्व

सामान्यांसाठी काम करून राज्याचा विकास करण्याचा आहे. विरोधकांकडे निषेध आणि आरोपांशिवाय काहीच नाही. आरोप आणि टोमणे. त्यामुळे आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यांच्या आरोपांना एकनाथ शिंदे कामातून उत्तर देतील. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. कष्टकरी कोण आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.

सर्वांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा विकास’ मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूर मंदिराच्या विकास आराखड्याबाबत सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याची घोषणा केली. तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून त्यांना दिलासा देण्यात आला आहे. पंढरपूर शहरातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेसाठी 109 कोटी व 12 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. ही पांडुरंगाची कृपा आहे.

अहमदनगरच्या काळे दाम्पत्याला महापूजेचा मान!
“देवगड संस्थानच्या भास्करजी महाराजांच्या प्रेरणेनं आम्हाला आज आह मान मिळाला.आम्ही 25 वर्षांहून अधिक काळ वारी करत आहोत. यावेळी मी गाडीने आलो. दर्शनासाठी आम्हाला 8 तास लागले”, असे यावेळी विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा मान मिळालेल्या काळे दाम्पत्याने सांगितले.

आनंदवार्ता ! तयारीला लागा, राज्यात डिसेंबरपर्यंत होणार दीड लाख सरकारी नोकरभरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

WhatsApp Image 2023 05 29 at 3.32.33 PM

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या डिसेंबर 2023 पर्यंत राज्यातील सरकारी खात्यांत, विभागांत दीड लाखाहून अधिक नोकरभरती करण्यात येईल,

🗣️ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पार पडलेल्या नीती आयोगाच्या बैठकीत दिली.

💁‍♀️ पहा काय म्हणाले मुख्यमंत्री

📝 येत्या २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश यांनी परस्पर सहकार्याने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत केले आहे.

हे ही वाचा : – पशुसंवर्धन विभागात विविध 446 पदांची भरती! पात्रता, शिक्षण ,अर्ज कुठे करायचा जाणून घ्या

💫 तसेच 4 दशलक्षाहून अधिक एमएसएमईचा मजबूत आधार असलेले महाराष्ट्र हे भारतातील आघाडीवरील औद्योगिक राज्य असल्याचे सांगत, एमएसएमईसाठी क्लस्टर योजना सुरू केली असल्याचेहि त्यांनी म्हटले केले.

🙏 राज्यात डिसेंबरपर्यंत दीड लाख नोकरभरती होणार – हि बातमी आपण प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे