शासकीय शाळांचे पुनर्जन्म – एक समताधिष्ठित, कायदेशीर आणि शाश्वत शिक्षणक्रांतीचा आराखडा.

शासकीय शाळांचे पुनर्जन्म

शासकीय शाळांचे पुनर्जन्म – एक समताधिष्ठित, कायदेशीर आणि शाश्वत शिक्षणक्रांतीचा आराखडा.

मुख्य भूमिका:

विश्वभूषण बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर साहेबांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा मूलभूत हक्क दिला आहे. अनुच्छेद 21(A) अंतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलाला “मोफत आणि सक्तीचे शिक्षण” देणे ही राज्याची जबाबदारी आहे. मात्र, आज शिक्षण हे ‘हक्क’ न राहता ‘खाजगी खर्चिक पर्याय’ बनत चालले आहे. ही घातक प्रवृत्ती थांबविण्यासाठी शासकीय शाळांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे.

घटक 1: संविधानिक आणि कायदेशीर चौकट – शिक्षणाचा हक्क केवळ प्रवेशापुरता नको.

1. RTE कायदा (2009) – केवळ प्रवेश नव्हे, गुणवत्तेची हमी:

कलम 8 आणि 9 अंतर्गत राज्य व स्थानिक प्रशासनाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे कायदेशीर बंधनकारक आहे.

Learning Outcomes, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर, पायाभूत सुविधा, मूल्यशिक्षण आदी निकष बंधनकारक असतानाही त्यांची काटेकोर अंमलबजावणी होत नाही.

2. कलम 38 – समानता व सामाजिक न्यायाचा आधारस्तंभ:

शिक्षणात विषमता ही समाजिक भेदाभेदाला खतपाणी घालते. शासकीय शाळांचा दर्जा उंचावल्याशिवाय सामाजिक न्याय साकारता येणार नाही.

3. कलम 51(A)(k) – पालकांचा कायदेशीर जबाबदारीचा घटक:

शिक्षण हे केवळ शासनाची जबाबदारी नाही; पालकांनी देखील आपल्या मुलांना शिक्षण मिळवून देण्याची जबाबदारी संविधानाने स्पष्ट केली आहे.

घटक 2: शैक्षणिक अडथळे – केवळ पायाभूत नव्हे, मानसिकतेची दुरवस्था.

1. “सरकारी” म्हणजे मागास – ही मानसिकता मोडीत काढणे आवश्यक

ही प्रतिमा बदलण्याकरिता प्रभावी जनजागृती आणि पालक संवाद मोहीम राबवावी.

शासकीय शाळांमधून यशस्वी झालेल्या IAS, डॉक्टर, इंजिनिअर यांच्या कथा शाळांच्या भिंतीवर असाव्यात.

2. ढासाळलेली शिस्त आणि गुणवत्ता.

गुणवत्तावान शिक्षणासाठी शिस्त, विद्यार्थिप्रेरणा, स्पर्धा आणि मूल्यशिक्षण यांचे पुनरावलोकन आवश्यक आहे.

3. शिक्षकांचे अप्रशिक्षितपणा आणि दुय्यम प्रशिक्षण:

NCTE (National Council for Teacher Education) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येक शिक्षकाचे नियमित पुनर्प्रशिक्षण आवश्यक करावे.

घटक 3: धोरणात्मक उपाययोजना – कायद्यानुसार, नियोजनबद्ध सुधारणा.

शाळांची शहरी व ग्रामीण विभागांतील एकात्मिक विकास योजना तयार करणे:

District School Development Index (DSDI) तयार करून प्रत्येक शाळेचे मूल्यमापन आणि उद्दिष्ट निर्धारण.

निधी वाटप गरजांनुसार आणि प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने.

CSR + PPP (Public Private Partnership) + VEC (Village Education Committee) मॉडेल:

CSR अंतर्गत खासगी कंपन्यांनी संगणक, स्मार्ट बोर्ड, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल लायब्ररी पुरवाव्यात.

ग्रामशिक्षण समित्यांना अधिकार देऊन शाळांच्या कारभारात पारदर्शकता व जबाबदारी आणावी.

“शिक्षक आरोग्य – शिक्षक विकास” धोरण:

शिक्षकांचे आरोग्य विमा, मानसिक आरोग्य, कौशल्य प्रशिक्षण केंद्र, कार्यक्षमतेवर आधारित पदोन्नती प्रणाली.

महाराष्ट्र शिक्षक कायदा सुदृढ करावा.

‘एक राष्ट्र – एक शिक्षण’ धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी:

CBSE, ICSE व राज्य मंडळ यातील दर्जा फरक कमी करून Common Minimum Curriculum तयार करणे.

घटक 4: डिजिटल शिक्षण – परिवर्तनाचा किल्ला.

1. शासकीय शाळांना ‘ई-स्मार्ट स्कूल’ बनविणे:

प्रत्येक जिल्ह्यात किमान 25 टक्के शासकीय शाळा डिजिटल शिक्षणासाठी सुसज्ज करणे.

भारत नेट (BharatNet) योजनेच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्टिव्हिटी 100% करणे.

2. DIKSHA, e-Pathshala सारख्या शासकीय अ‍ॅप्सचा सकस वापर:

शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ई-कंटेंट डिझाइन प्रशिक्षण.

घटक 5: भविष्यदृष्टी – शासकीय शिक्षणाचे समृद्ध भविष्य.

मिशन 2040 – “गुणवत्ता आणि समता”:

2040 पर्यंत देशातील प्रत्येक शासकीय शाळा NAAC-Education Grading System अंतर्गत B+ दर्जाच्या वर असावी.

गुणवत्तेच्या निकषांमध्ये लोकशाही मूल्य, लैंगिक समानता, पर्यावरण शिक्षण, उद्योजकता, संशोधन यांचा समावेश.

शिक्षण हा ‘सेवा हक्क’ म्हणून OMBUDSMAN प्रणाली:

शिक्षणाची गुणवत्ता, गैरसोयीबाबत पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या तक्रारीसाठी स्वतंत्र शिक्षण लोकपाल संस्था.

घटक 6: शिक्षणात ‘बाजारीकरण’ नको – ट्युएशन क्लासेसमुळे होणारी शुद्धतेची गळचेपी.

 शिक्षण काय? सेवा की व्यवसाय?

भारतीय परंपरेनं शिक्षण हे सेवा आणि आत्मविकासाचे माध्यम मानले. पण अलीकडच्या काळात शिक्षण क्षेत्राला ‘उद्योग’ किंवा ‘बाजार’ मानण्याची प्रवृत्ती बळावत आहे. शाळा आणि ट्युएशन क्लासेस यांच्यातील सीमारेषा धूसर झाली आहे.

खाजगी ट्युएशन क्लासेस – शिक्षणाच्या बाजारूकरणाची कुचकामी छाया:

1. शाळेच्या गुणवत्तेवर अविश्वास:

सरकारीच काय, अनेक खाजगी शाळाही विद्यार्थ्यांना ट्युएशनसाठी ढकलतात. कारण शिक्षक स्वतःच्या ट्युएशन क्लासेस चालवत असतात – हा शैक्षणिक पवित्रतेचा गंभीर अपमान आहे.

2. शिक्षणाच्या नावावर ‘दहावी-बारावी प्रलय’:

परीक्षा नजरेसमोर ठेवून केलेले घोकंपट्टी, शंका निरसन ऐवजी ट्रिक्स, शॉर्टकट यावर भर. त्यामुळे मूल्यशिक्षण, सृजनशीलता, समज आणि विश्लेषण दुर्लक्षित होत आहे.

3. गरीबांसाठी अजून एक आर्थिक ओझं:

एकाच वेळेस शाळा + क्लासेस यामध्ये वर्गणी आणि फीचा दुहेरी खर्च. ही व्यवस्था आर्थिक विषमता वाढवते.

4. शालेय शिक्षकांचे ट्युएशनमध्ये आकर्षण:

अनेक शिक्षक सरकारी नोकरी करूनही खासगी ट्युएशन चालवतात – यावर कायदेशीर निर्बंध व कारवाई आवश्यक आहे.

समाधान: शिक्षण पुन्हा पवित्र बनवणे

1. “ट्युएशन फ्री शिक्षण” धोरण:

शाळेतील वर्गपद्धती, शंका निरसन सत्र, विद्यार्थीनिर्देशित प्रोजेक्ट आधारित शिक्षणदृष्टिकोन बळकट करावा.

शिक्षकांची अतिरिक्त शिकवणी शाळेमध्येच आयोजित करावी आणि ती मोफत असावी.

2. ‘बाजारू शिक्षण’ विरोधी कायदेशीर चौकट तयार करणे:

शिक्षण विभागाने नियमितपणे क्लासेसवर व शिक्षकांच्या व्यावसायिक हस्तक्षेपावर नियंत्रण ठेवावे.

शालेय शिक्षकांना खासगी ट्युएशन चालवण्यास मज्जाव करणारे स्पष्ट नियम लागू करणे.

3. पालक जनजागृती अभियान:

ट्युएशन ही गरज नव्हे तर शाळेतील शिक्षणाचे अपयश हेच कारण असल्याचं समजावणं गरजेचं आहे.

शिक्षण – बाजार नव्हे, संस्काराचे केंद्र असावे:

शिक्षण हे ‘दैनंदिन व्यवहारासाठी शस्त्र’ नसून, ‘मानवी जीवन समजून घेण्याचा दीपस्तंभ’ असावा. बाजाराचा वास आणि नफा-तोट्याची भाषा जेव्हा शिक्षणात येते, तेव्हा विद्या ‘मूल्य’ नसून ‘माल’ बनते.

शालेय शिक्षणाच्या शुद्धतेसाठी, शासकीय शाळांना सक्षम करणे आणि शिक्षणव्यवस्थेतील बाजारीकरण रोखणे – हाच पुढचा संविधानिक व नैतिक लढा आहे.

शेवटचे विचार – ही लढाई शाळांची नाही, समाजाच्या भविष्याची आहे:

शासकीय शाळा या समाजातील समतेच्या बळकटीकरणाचा गाभा आहेत. त्या केवळ शिक्षण देत नाहीत, तर राष्ट्र उभारतात. ही केवळ इमारत नव्हे, तर संवैधानिक मूल्यांचे व्यासपीठ आहे.

आपल्याला निवड करायची आहे – शाळा बंद करण्याची की नवीन भारत घडविण्याची!

✍️ डॉ. राजन माकणीकर

विद्रोही पत्रकार | संविधान प्रचारक | सामाजिक विश्लेषक | संस्थापक – के. ईश्वर फाउंडेशन, मुंबई. भ्रमंनध्वनी क्र. 9004545045

pune bridge collapsed 2025 : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; ४ मृत, २० पेक्षा अधिक जण वाहून गेले, NDRF तातडीने दाखल

pune bridge collapsed

pune bridge collapsed : पुणे, १६ जून २०२५

पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील पूल आज सकाळी अचानक कोसळल्यामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला असून, २० ते २५ जण पाण्यात वाहून गेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेचा तपशील:

pune bridge collapsed : सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा पूल कोसळला. त्यावेळी पूलावरून शाळकरी मुले, स्थानिक नागरिक आणि काही दुचाकीस्वार जात होते. अचानक संरचना खचल्याने संपूर्ण पूल नदीत कोसळला.

pune bridge collapsed : जवळपास ४० वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल अनेक वर्षांपासून दुरवस्थेत होता, मात्र त्याकडे दुर्लक्ष झालं होतं, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

>>> डिजिटल ग्रामपंचायत,आता तुमच्या मोबाईलमध्ये!


बचाव कार्य सुरू:

  • NDRF, SDRF पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
  • बोटींनी आणि गोताखोरांच्या साहाय्याने शोधमोहीम राबवली जात आहे.
  • 8 जणांना गंभीर अवस्थेत जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

प्रशासनाची प्रतिक्रिया:

pune bridge collapsed : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी पोहचले असून, बचाव कार्याच्या गतीसाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.


स्थानिकांचे संतापजनक आरोप:

  • पूल खचत असल्याचं आम्ही वारंवार प्रशासनाला कळवलं होतं, पण कोणी ऐकलं नाही,” असा आरोप ग्रामस्थांनी केला.
  • स्थानिक आमदार व अधिकाऱ्यांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

Punjabrao Dakh Weather Forecast2025 : पंजाबराव डख यांचा अलर्ट! मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचा इशारा, ‘या’ भागांमध्ये सतर्कता गरजेची

Punjabrao Dakh Weather Forecast

Punjabrao Dakh Weather Forecast : डख साहेबांचा हवामान इशारा: विजांसह मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट!

Punjabrao Dakh Weather Forecast : हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामानाबाबतचा नवीन अंदाज वर्तवला आहे. राज्यात 20 जून पर्यंत भाग बदलत पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलं आहे.

कुठं कुठं कधी पडणार पाऊस?

12, 13, 14 जून –पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ मध्ये पाऊस पडणार आहे.
13, 14, 15 जून – दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण खूप पाऊस पडणार आहे.
विजेच्या काडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

Punjabrao Dakh Weather Forecast : या दरम्यान जनतेनं स्वतःची तसेच जनावरांची काळजी घेणे महत्वाचे आहे. जास्त वादळ आणि वाऱ्याची संभावना असल्यामुळे झाडे पडण्याची भीती पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.

ज्यांच्या जमिनीमध्ये पुरेशी ओल ते पेरणी करु शकतात

Punjabrao Dakh Weather Forecast : ज्यांच्या शेतजमिनीमध्ये ओल आहे ते शेतकरी पेरण्याची तयारी करू शकतात. ज्यांना लागवड करायची त्यांनी योग्य निर्णय घ्यावा कारण की राज्यामध्ये 20 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या भावात पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.

>>> महत्त्वाची बातमी! जुना आधार कार्ड होणार अमान्य, सरकारनं दिलं मोठं अपडेट

राज्याच्या विविध भागात जोराचा पाऊस पडणार

Punjabrao Dakh Weather Forecast : मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर, नगर या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार आहे. 14 जून ते 18 जून दरम्यान लातूर, नांदेड, बीड, धाराशीव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, जालना, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, पारगुळा. तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम, यवतमाळ सांगायचं झालं तर सर्व जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे.

Punjabrao Dakh Weather Forecast : त्यामुळं या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

aadhar card update2025 : महत्त्वाची बातमी! जुना आधार कार्ड होणार अमान्य, सरकारनं दिलं मोठं अपडेट

aadhar card update

आधार कार्डधारकांसाठी मोठा अलर्ट – जुना कार्ड रद्द होऊ शकतो, जाणून घ्या काय कराल?



aadhar card update : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत १४ जून २०२५ रोजी संपणार होती, ती आता १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

..तर आधार कार्ड रद्द होणार

ज्या नागरिकांनी अद्याप आपले आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांना आणखी एक वर्षाचा कालावधी मिळाला आहे. विशेषतः ज्या व्यक्तींचे आधार कार्ड १० वर्षे किंवा त्याहून अधिक जुने आहे, त्यांनी एकदाही ते अपडेट केलेले नाही, त्यांच्यासाठी हे अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की अशा व्यक्तींनी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सादर करून आपले आधार तपशील अद्ययावत करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास त्यांचे आधार कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.

>>> “दिसतो स्वर्ग आपणालास्वतः मेल्यावरती…अन् बापाचा संघर्ष कळतोस्वतः बाप झाल्यावरती..!!”पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

aadhar card update : आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांना दोन प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता

WhatsApp Image 2025 06 13 at 11.05.21 PM
  • ओळखीचा पुरावा (उदा. पॅन कार्ड)
  • दुसरा पत्त्याचा पुरावा (उदा. मतदार ओळखपत्र). साधारणपणे आधार केंद्रांवर या प्रक्रियेसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते.
घरबसल्या करू शकता अपडेट

aadhar card update : नागरिक घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आधार अपडेट करू शकतात. https://uidai.gov.in/

संकेतस्थळावर ‘अपडेट आधार’ या पर्यायावर क्लिक करा.

आपला आधार क्रमांक टाकून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी (OTP) वापरून लॉग इन करा.

‘डॉक्युमेंट अपडेट’ या पर्यायावर क्लिक करून आपले तपशील तपासा.

त्यानंतर, ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.

सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री करून ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.

अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यानंतर एक विनंती क्रमांक (Request Number) मिळेल. या क्रमांकाद्वारे नागरिक आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाइन तपासू शकतील. काही दिवसांतच आधार कार्डमधील माहिती अद्ययावत होईल.

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

डिजिटल ग्रामपंचायत 2025 : तुमच्या मोबाईलमध्ये गावाचं कार्यालय!

डिजिटल ग्रामपंचायत

डिजिटल ग्रामपंचायत : मेरी पंचायत’ अँप लाँच — ग्रामपंचायतीच्या प्रत्येक निर्णयाचा पारदर्शक लेखाजोखा एकाच क्लिकवर!

काय मिळेल?

  • निधी व खर्च — ग्रामपंचायतीची बँक खाती आणि खर्चाची संपूर्ण माहिती
  • कामांची प्रगती — रस्ते, पाणी, इमारती इ. कोणत्या टप्प्यावर आहेत ते लाइव्ह ट्रॅक करा
  • सदस्य व समित्या — सरपंच, सदस्यांची यादी व त्यांच्या जवाबदाऱ्या
  • नोटीस बोर्ड — ताज्या शासकीय सूचना, बैठकांचे ठराव थेट तुमच्या हातात

डिजिटल ग्रामपंचायत : पाणी स्रोत व नळजोडणी — स्रोतांची तपशीलवार नोंद व पाणी तपासणीची माहिती

तुमचा आवाज, तुमची पंचायतीतली ताकद!

डिजिटल ग्रामपंचायत : २५० शब्दांत अभिप्राय द्या, फोटो अपलोड करून चुका दाखवा किंवा उत्तम कामाचं कौतुक करा.

डिजिटल ग्रामपंचायत : “लोकशाहीची खरी शक्ती म्हणजे पारदर्शकता; ‘मेरी पंचायत’ अँपमुळे ती आता प्रत्येकाच्या हातात आली आहे!”

>>> मोठी बातमी! एअर इंडियाचं विमान कोसळलं, सगळीकडे धुराचे लोट

आजच डाउनलोड करा आणि आपल्या गावाच्या विकासात प्रत्यक्ष सहभागी व्हा!

ही माहिती इतरांनाही शेअर करा — प्रत्येक नागरिकापर्यंत ‘मेरी पंचायत’ पोहोचवा!
गाव सुधारेल तेव्हा देश घडेल!

“MSRTC ची नवी योजना 2025 : मुलींना मोफत आणि मुलांना 66% सवलतीसह लालपरी पास शाळेतून मिळणार”

MSRTC ची नवी योजना 2025

MSRTC ची नवी योजना 2025 : यंदाच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात १६ जूनपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्येच मोफत प्रवास व सवलतीच्या पासचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

MSRTC ची नवी योजना : शाळांमध्ये परगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी व त्यांचे बोनाफाईड मुख्यापकांनी दिल्यास त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ‘लालपरी’च्या प्रवासाचे पास मिळणार आहेत.

◾शाळकरी मुलींसाठी लालपरी’च्या प्रवासात १०० टक्के सवलत पास मिळणार आहे.
◾मुलांना तिकीट दराच्या ३४ टक्के शुल्क भरायचा असून एकूण ६६ टक्के सवलत पास मिळणार आहे.

>>> शेतजमीन खरेदीसाठी SBI बँकेकडून कर्ज: पात्रता, नियम आणि अटी

MSRTC ची नवी योजना 2025 : एसटी महामंडळाच्या बसमधून सध्या


६० वर्षांवरील ज्येष्ठांना ५० टक्के सवलत आहे.
७५ वर्षांवरील वृद्धांना मोफत प्रवास आहे.
लाडक्या बहिणींना ५० टक्के सवलत आहे.
शाळा-महाविद्यालयातील मुलींसाठी देखील मोफत प्रवासाची योजना लागू आहे. त्यामुळे आता आपल्या शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना एकत्रित प्रवासाचे पास मिळावेत म्हणून मुख्याध्यापक आणि प्रचार्यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.

मुला-मुलींना द्यावे लागणार बोनाफाईड

MSRTC ची नवी योजना 2025 : एलकेजी, युकेजी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व उच्च महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची मोफत पासची योजना सुरू आहे. मुलींसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना आहे.

MSRTC ची नवी योजना 2025 : योजनेतून मोफत पास काढण्यासाठी मुलींना किंवा मुलांना त्या शाळा-महाविद्यालयाचे बोनाफाईड व एक छायाचित्र द्यावे लागणार आहे. मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांना त्यांच्या शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थिनींना मोफत बस पास द्यायचे असल्यास त्यांनी तसे पत्र महामंडळाच्या आगारप्रमुखांना द्यायचे आहे. त्यानुसार त्यांना त्यांच्या शाळेत पास उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

शाळा सुरू होताच कार्यवाही

MSRTC ची नवी योजना 2025: परगावाहून शाळा-महाविद्यालयात मोठ्या संख्येने येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळांमध्ये पास उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. शाळा सुरू होताच त्यानुसार आगार नियंत्रक कार्यवाही होईल.

SBI शेती कर्ज 2025 : शेतजमीन खरेदीसाठी SBI बँकेकडून कर्ज: पात्रता, नियम आणि अटी

SBI शेती कर्ज

SBI शेती कर्ज : जर तुम्हाला शेतीसाठी जमीन खरेदी करायची असेल आणि तुमच्याकडे भांडवल नसेल तर काळजी करू नका, भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय तुम्हाला कर्ज देत आहे. मग आता हे कर्ज कसं मिळवायचे? त्याचे नियम आणि अटी काय आहेत? हेच आपण जाणून घेणार आहोत.

स्टेट बँक ऑफ इंडिया योजना काय आहे?

SBI शेती कर्ज : स्टेट बँक ऑफ इंडियाने जमीन खरेदी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, तुम्ही शेतीयोग्य जमीन खरेदी करण्यासाठी बँकेकडून 85 टक्के पर्यंत कर्ज घेऊ शकता. या योजनेअंतर्गत, तुम्हाला 7 ते 10 वर्षांत कर्ज परत करावे लागेल. कर्जाची परतफेड केल्यानंतर, खरेदी केलेल्या जमिनीवर तुमचा मालकी हक्क असेल. या योजनेचा उद्देश लहान शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांना शेतीयोग्य जमीन खरेदी करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे.

कर्ज मिळवण्यासाठीच्या नियम अटी काय आहेत?

https://a1myecard.com/ : एसबीआय जमीन खरेदी योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्जदाराकडे कोणत्याही प्रकारचे थकित कर्ज नसावे.

या योजनेअंतर्गत अर्जदाराचा कर्ज परतफेड करण्याचा किमान 2 वर्षांचा चांगला रेकॉर्ड असावा.

>>> आयकर भरणाऱ्या बहिणींना धक्का! आयकर भरणाऱ्या बहिणींसाठी पंधराशे रुपयांचा लाभ होणार बंद

इतर बँकांचे चांगले कर्जदार देखील अर्ज करू शकतात, परंतु यासाठी त्यांनी इतर बँकांचे कर्ज फेडलेले असावे. शेतकऱ्यांना शेती खरेदीसाठी कर्ज मिळू शकते.

SBI शेती कर्ज : जमिनीच्या मूल्यांकन केलेल्या किंमतीच्या ८५ टक्के रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध आहे, जे जास्तीत जास्त ५ लाख रुपये आहे.

या ८५ टक्के जमिनीची किंमत बँक स्वतः ठरवेल. 2.5 एकरपेक्षा कमी बागायती जमीन असलेले शेतकरी कर्जासाठी अर्ज करू शकतात.

या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतकरी कर्जासाठी अर्ज करू शकतात.

SBI शेती कर्ज : 5 एकरपेक्षा कमी सिंचनाखालील जमीन असलेले शेतकरी देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

SBI शेती कर्ज : शेतकरी जमिनीवर उत्पादन सुरू होण्यापूर्वी या निर्धारित मोकळ्या वेळेत शेतकऱ्याला कोणताही हप्ता भरावा लागणार नाही. या योजनेअंतर्गत, शेतकरी जमिनीवर उत्पादन सुरू झाल्यापासून जास्तीत जास्त 9 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सहामाही हप्त्यांमध्ये कर्ज परतफेड करू शकतात.

राष्ट्रीय पुरस्कार सोहळा 2025: पै. सुभाष दादा पाटील युथ फाउंडेशनने देशभरातील कार्यकर्त्यांचा केला सन्मान”

राष्ट्रीय पुरस्कार सोहळा 2025

राष्ट्रीय पुरस्कार सोहळा 2025 : “पिंपळगाव बुद्रुकमध्ये उत्साहात पार पडला राष्ट्रीय गौरव सोहळा – 150 मान्यवरांना सन्मानित”


राष्ट्रीय पुरस्कार सोहळा 2025 : पिंपळगाव बुद्रुक (ता. कागल) येथे “पै. सुभाष दादा पाटील युथ फाउंडेशन महाराष्ट्र” यांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, पत्रकारिता, कला, साहित्य, उद्योजकता या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील 150 मान्यवरांचा गौरव या सोहळ्यात करण्यात आला.

राष्ट्रीय पुरस्कार सोहळा 2025 : या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पै. सुभाष दादा पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री रंगराव पाटील (ब्रॅंच पोस्टमास्तर, पिंपळगाव), मा. सौ. रागिनी खडके मॅडम (इन्स्पेक्टर, धर्मादाय कार्यालय, कोल्हापूर), कार्याध्यक्ष बाळूमामा देवालय (आदमापूर), मा. सौ. स्मिता राणी गुरव (सभापती, गारगोटी पंचायत समिती), मा. सौ. वैशाली झांजगे मॅडम (रयत विद्यार्थी विचार मंच, जिल्हा कार्याध्यक्ष), मा. श्री युवराज मिरजकर (वेदिका कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस, डायरेक्टर), मा. सौ. अनिता रावण (अध्यक्ष, सावित्रीबाई महिला बहुउद्देशीय संस्था), मा. सौ. नंदाताई विभुते (जिल्हाध्यक्ष, मानव सुरक्षा सेवा समिती कोल्हापूर) आणि मा. सौ. अनिता घाडगे (यशराज महिला मंच, कराड) हे मान्यवर उपस्थित होते.

WhatsApp Image 2025 06 09 at 4.14.29 AM

>>> विवाह आनंदाचा विषय न राहता डोकेदुखी का बनतोय ?

राष्ट्रीय पुरस्कार सोहळा 2025 : कार्यक्रमात सहभागी मान्यवरांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्यास नवसंजीवनी देण्याचे कार्य युथ फाउंडेशनने यशस्वीरित्या पार पाडले.

WhatsApp Image 2025 06 09 at 4.14.28 AM

या पुरस्कार सोहळ्याचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन अनिता घाडगे मॅडम यांनी केले.

नाशिक कुंभमेळा 2027: अमृतस्नानासह संपूर्ण वेळापत्रक जाहीर!

नाशिक कुंभमेळा 2027

नाशिक कुंभमेळा 2027 : नाशिक सिंहस्थ कुंभमेळा 2027 चे वेळापत्रक जाहीर – १८ महिन्यांचा अध्यात्मिक उत्सव!

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहण होणार आहे. हा भव्य धार्मिक सोहळा तब्बल 18 महिने म्हणजेच 31 ऑक्टोबर ते जुलै दरम्यान नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होणार आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.

नाशिक कुंभमेळा 2027 : कुंभमेळा अधिक दीर्घकालीन आणि नियोजित स्वरूपात पार पडणार आहे. यामध्ये 3 मुख्य शाही स्नान आणि 42 पर्व स्नान समाविष्ट असणार आहेत. शाही स्नान जुलै ते सप्टेंबर दरम्यान दीड महिन्याच्या कालावधीत पार पडणार आहेत. 29 जुलै 2027 रोजी नगर प्रदक्षिणा होईल. तर पहिले अमृतस्नान हे सोमवारी, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. तर या महाकुंभातील दुसरं अमृतस्नान 31 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. तर तिसरं आणि शेवटचं अमृतस्नान हे 11 सप्टेंबर 2027 रोजी नाशिक येथे होईल.

>>>> अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी – आता मिळणार ‘शिक्षिका’ दर्जा

कुंभमेळा नियोजन संदर्भात होणाऱ्या बैठकीत कुंभमेळा मध्ये होणाऱ्या अमृत्स्नान तारखा जाहीर

त्रंबकेश्वर अमृतस्नान तारीख जाहीर


नाशिक कुंभमेळा 2027 : ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृतस्नान -2-08-2027
द्वितीय अमृतस्नान – 31-08- 2027
तृतीय अमृतस्नान – 12- 09-2027

नाशिक कुंभ अमृतस्नान तारीख


31-10-2026 ध्वजारोहण करून कुंभ पर्वाला सुरुवात
पहिले अमृतस्नान -2-08-2027
द्वितीय अमृतस्नान – 31-08- 2027
तृतीय अमृतस्नान – 11- 09-2027

Add a subheading 2

अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी 2025 – आता मिळणार ‘शिक्षिका’ दर्जा

अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी

अंगणवाडी सेविका आता बनणार ‘शिक्षिका’!

नवीन शैक्षणिक धोरणामुळे झेडपी शाळांची पटसंख्या वाढणार!

अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी : २०२५-२६ पासून लागू होणारं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) घेऊन येत आहे एक मोठा बदल –

अंगणवाडीतील ‘सेविका’ बनणार ‘शिक्षिका’!
म्हणजे आता केवळ पोषण व देखरेख नाही, तर पूर्व-शाळा शिक्षणाचं एक सशक्त केंद्र बनणार अंगणवाडी!

३ ते ६ वर्ष वयोगटातील मुलांसाठी खास खेळातून शिक्षण!
अक्षर-ओळख, अंक, शब्द, सामाजिक व बौद्धिक विकास यावर भर
शाळेची गोडी निर्माण करणं हेच मुख्य उद्दिष्ट

अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी : पालकांची देखील होणार सक्रीय भागीदारी!
संवादातून मुलांच्या प्रगतीचा आढावा

>>> दरमहा १००० रुपये आणि मोफत

सेविकांचे प्रशिक्षण काय असेल?


बारावी उत्तीर्ण – ६ महिन्यांचे प्रशिक्षण
दहावी उत्तीर्ण – १ वर्षाचा बालशिक्षण अभ्यासक्रम
डायट मार्फत ऑनलाईन अभ्यास, कार्यशाळा, प्रमाणपत्र अभ्यासक्रम अनिवार्य!

अंगणवाड्यांची आकडेवारी (महाराष्ट्र)


प्रकल्प – ५५३
अंगणवाड्या – १०,५५६
सेविका – १,२५,०००+

यामुळे होणारे फायदे:


लहानग्यांची शैक्षणिक पातळी सुरुवातीलाच भक्कम
झेडपी शाळांमध्ये प्रवेश व गुणवत्ता वाढणार
ग्रामीण शिक्षणात नवीन उजाळा

निष्कर्ष:


अंगणवाडी = पूर्व-शाळा शिक्षण केंद्र
सेविका = प्रशिक्षित शिक्षिका
शिक्षण = खेळ, विज्ञान व आनंद यांची त्रिसुत्री!

  • ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा – गरजूंना नक्कीच उपयोग होईल!*
    WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करा

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे