माझ्या आईला कोणी पाहिलं का…?? मला माझी आई हवी आहे… आई कुठं गेली असेल ती…?? वय – दोन वर्ष
आई… कुठे आहेस गं ?? मी शाळेला चाललोय… अच्छा टाटा… मला शाळेत तुझी आठवण येते गं… वय – पाच वर्ष
मम्मा… लव यू… आज टिफिनमध्ये काय आहे गं ?? आई आज शाळेतून खूप गृहपाठ दिला आहे… वय – आठ वर्ष
बाबा, आई कुठे आहे…?? शाळेतून घरी आल्यावर आई दिसली नाही तर कसं तरी होतं… वय – बारा वर्षे
आई बसना गं जवळ, मला खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी… वय – चौदा वर्ष
काय गं आई, तू तरी समझ ना… बाबांशी बोलना, मला पार्टीला जाउ दे म्हणून सांग ना गं… वय – अठरा वर्ष
काय आई… जग बदलते आहे, तू समजत नाहीयेस, तुला काहीच कळत नाही… वय – बावीस वर्षे
आई… आई… जेंव्हा बघावे तेंव्हा काय शिकवत असतेस मला…?? मी काय लहान बाळ आहे का आता…?? वय – पंचवीस वर्षे
ए आई… ती माझी पत्नी आहे… तू समजून घे ना तिला… तिला शिकवण्यापेक्षा तू तुझी मानसिकता बदल…. वय – अठ्ठावीस वर्षे
अगं आई… ती पण एक आई आहे, तिला तिच्या मुलांना सांभाळता येते, तू प्रत्येक बाबतीत लूडबूड करू नकोस… वय – तीस वर्ष
आणि त्या नंतर… आईला कधी विचारलं नाही… आई कधी म्हातारी झाली त्याला कळलंच नाही…
आई तर आज पण तीच आहे… फक्त वयानुसार मुलांचं तिच्याशी वागणं बदलत गेलं…
नंतर एक दिवस….. आई . . . आई . . . . . गप्प का आहेस…?? बोल ना…?? पण आई काहीच बोलत नाही. कारण ती कायमची गप्प झाली होती… वय – पन्नास वर्षे
ती भाबडी आई… दोन वर्षांपासून पन्नास वर्षांपर्यंत लेकरातल हा बदलावं समजू शकली नाही… कारण आईसाठी तिचा मुलगा पन्नास वर्षाचा प्रौढ झाला तरी लहानच असतो… ती बिचारी तर शेवटपर्यंत त्या मुलाच्या लहान सहान आजारांवर पण तशीच तळमळते जशी तळमळ त्याच्या लहानपणी असायची….
आणि मुलगा…?? आई गेल्यावरच त्याला समजतं… कि त्याने कोणता अमूल्य खजिना गमावला आहे… पण तेव्हा रडून काहीच उपयोग नसतो… 😭😩😤😭😤😩😭
वयोमानानुसार बडबडणा-या वृध्द आई-बाबांना समजून घेता आले तर बघा… एवढं जमलं तरी तुम्ही सुशिक्षित झालात असं समजा… नाहीतर तुमच्या ढिगभर डिग्र्या काही कामाच्या नाहीत…
आपल्या आई बाबांना जिवापाड जपा… त्यांची सेवा करा… सेवा जमत नसेल तर केवळ आदर तरी करा, तो ही पुरेसा आहे त्या माऊलींना……
आणि एक विनंती, प्रत्येकाने ही पोस्ट नक्कीच शेअर करा… ह्यामुळे कोणाला तरी ह्या मोठेपणात विसर पडलेल्या आईची पुन्हा एकदा जाणीव होऊन जाईल… ते ही तुमच्यामुळे… या खोट्या झगमगाटात, त्या आलीशान बंगल्यात तेव्हढं सुख मिळत नाही जेव्हढं सुख आपल्या आईच्या कुशीत डोकं ठेवल्यावर मिळालेलं असतं…
हे कुणालाही, कधीही, कुणाकडूनही ऐकायला आवडतील असे शब्द…..
आपण कुणाच्या तरी आठवणीत आहोत, हे मनाला सुखावणारं…. आपला एखादा शब्द, एखादी कला, एखादा गुण किंवा केलेली कृती कुणाच्या तरी मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसते आणि कधी क्षणाची संधी मिळाली, की जमिनीतून झरा फुटावा तशी नेणीवेतून जाणिवेत येते…..
कधी सहजच काही आठवतं कुणाबद्दल,… अगदी छोटासाही संदर्भ पुरतो त्यासाठी… फार काही विशेष नसलं, तरी दोन क्षण पुन्हा इतिहासात जातोच आपण,
आणि जेव्हा अशी एखादी आठवण, जी, खूप प्रयत्नांनी आपण अंतर्मनात ढकललेली असते…. केव्हातरी मनातल्या कुपीतून बाहेर पडतेच…
आणि तेव्हा…… तेव्हा मग मनात श्रावण फुलतो… सगळं मन हळदीचं होऊन जातं… चेहऱ्यावरचे भाव चटकन बदलतात….. कुणाशी तरी हितगूज करावंसं वाटतं….
पण नक्की काय ते कळत नाही…. मग आपणच बोलत राहतो आपल्या आठवणींशी……… बऱ्याच वेळा स्वतःशीच… शक्य झालं तर कधी दुसऱ्याशी…. स्वतःशीच हसतो… डोळे चमकतात…. नकळत आपला मुखवटा गळून पडतो, चेहऱ्याची इस्त्री विस्कटते…. स्वतःचीच नव्याने ओळख होते…. छान मोकळं वाटायला लागतं… पण अगदी क्षणभरच……….
आणि हा अनुभव फार छान असतो… क्षणभर आपण आपले सगळे त्रास… सगळ्या dead lines विसरतो… ढगाळलेलं आभाळ क्षणात स्वच्छ होतं….. अंगात अठरा हत्तींचं बळ संचारतं….. काहीच अशक्य नाही असं वाटायला लागतं….. आणखी असंच काय काय होतं…
अनुभवलंय कधी?
म्हणून म्हटलंय… आठवण स्वतःच एक साठवण असते… ती आपली कुणी काढू दे… किंवा आपल्याला कुणाची येऊ दे….. क्षणात आपल्याला क्षणभरासाठी का होईना… बदलवून टाकते… एवढं मात्र खरं.
म्हणून आजपासून एकच करूया…. कधी कुणाची आठवण आलीच, तर तडक त्या व्यक्तीला सांगून टाकूया….
ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची लढाऊ ‘सुखोई 30’ मधून उत्तुंग भरारी
पुणे : राजकीय नेत्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागणारा चोरटा गजाआड; २० पेक्षा अधिक गुन्हे केल्याचे उघड आरोपीने यापूर्वी राजकीय नेते, डाॅक्टर पोलीस अधिकारी असल्याची बतावणी, तसेच त्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागितल्याचे २० पेक्षा जास्त गुन्हे केले आहेत.
पूर्वी दिसतही नव्हते असे लोक आता रस्त्यावर उतरत आहेत आणि…” एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला अयोध्या दौऱ्याच्या आधी नाव न घेता एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
राष्ट्रवादीच्या आमदाराची भूमिका संशयास्पद एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांच्याबाबत पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हृदयद्रावक: रस्त्यावरील खड्डा चुकवताना मृत्यूशी झाली भेट; कांदा विक्रीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
“नरडं दाबून त्यांना कायमचं…”, रॅपर उमेश खाडेला ताब्यात घेतल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया रॅपर उमेश खाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्याची भेट घेतली आहे.
🤩 आरोग्य विभागात लवकरच 15 हजार जागांची भरती; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा
▪️गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली होती. अशातच प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती केली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. राज्यस्तरीय ‘अवयवदान जनजागृती अभियान’चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पार पडले. यावेळी महाजन बोलत होते.
🛤️ देशातील पहिला 7 किमी लांबीचा समुद्राखालील बोगदा ठाण्यात
▪️मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे 21 किमी लांबीचा वांद्रे – कुर्ला संकुल ते शिळ फाटा बोगदा. या बोगद्याच्या कामासाठी आर्थिक निविदा उघडण्यात आल्या आहेत. तसेच 21 किमी लांबीच्या बोगद्यापैकी ठाणे खाडीतून जाणारा 7 किमी लांबीचा बोगदा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे.
🤗 CNG-PNG च्या दरात मोठी कपात, नवीन दर लागू
▪️अदानी टोटल गॅस लिमिटेडने जनतेला दिलासा दिला आहे. कंपनीने सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 8.13 रुपये आणि पीएनजीच्या दरात 5.06 रुपये प्रति घन सेंटीमीटरने कपात करण्याची घोषणा केली आहे. सीएनजी-पीएनजीचे सुधारित दर 8 एप्रिलच्या मध्यरात्री 12 पासून लागू झाले आहेत.
🫡 2023 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती : शाहरुख खान
▪️ ‘टाइम’ मासिकाच्या 2023 च्या 100 जणांच्या यादीत अभिनेता शाहरुख खानने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने फुटबॉलपटू लायोनल मेस्सी, ब्रिटनचे राजपुत्र हॅरी आणि मेगन मर्केल, ऑस्कर विजेती मिशेल यो आणि मेटाचा सीईओ मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकले आहे. या यादीसाठी जवळपास 12 लाख वाचकांनी मतदान केले होते. त्यापैकी चार टक्के मते किंग खानला मिळाली आहेत. या यादीत दुसरा क्रमांक इस्लामी शासनपद्धतीत अधिक स्वातंत्र्य मिळावे यासाठी लढा देणाऱ्या इराणी महिलांना मिळाला आहे.
🤔 सर्व ग्रुप्स ऍडमिन्सला पगार चालू .. ❓ ⬇️ येथे वाचा 👇
मध्यरात्री दोनच्या सुमारास घराची बेल वाजली… तायडे, आम्ही आलोय गं! बाहेरून आवाज आल्याने संगीता जागी झाली. तायडे असा आवाज आल्याने आपल्या माहेरचंच कोणीतरी आलं असावं याची खात्री संगीताला पटली. तिने आयव्होलमधून पाहिले. तिघेजण पावसात भिजल्याने कुडकुडत उभे होते. तिने पटकन दार उघडून तिघांनाही आत घेतले.
एवढ्या रात्री कोठं गेला होतात? तिने विचारले. आमच्या कामधंद्याची हीच वेळ असते त्यातील टोपीवाला बोलला. मी तुम्हाला ओळखलं नाही पण तुम्ही माहेरच्या नावाने हाक मारली म्हणून दरवाजा उघडला संगीताने खुलासा केला. तुमचा धाकटा भाऊ मन्या, जलसंपदा खात्यात नोकरीला असणारा. आमचा लई जिगरी दोस्त आहे. तसेच तुमचा थोरला भाऊ सुधीर. जातेगावला शिक्षक असणारा, आम्ही लहानपणी एकत्रित खेळलोय. बागडलोय.. शिवाय तुमची धाकटी बहीण सुषमा… एका दाढीवाल्याने एवढी माहिती दिल्यावर संगीताचा त्यांच्यावर विश्वास बसला.
ती त्यांना चहा करायला किचनमध्ये गेली. चहाचे कप त्यांच्या हातात दिल्यावर ती म्हणाली, तुम्ही माझ्या माहेरची सगळी माहिती बरोबर सांगितली पण गावात तुम्हाला मी कधी पाहिलं नाही! संगीताने आश्चयनि म्हटले. आम्ही एका जागेवर कशाला राहतोय? आमचा येरवड्याला इंग्रजाच्या काळातला मोठा वाडा आहे. आम्ही वर्षातील सात-आठ महिने तिथं काढतो. तिथं आमचं गणगोत बी लई मोठं हाये, तेथून बाहेर पडल्यावर राज्यभर बिझनेससाठी फिरतीवर असतो. टोपीवाल्याने माहिती दिली.
माझे पती नेमके आज सकाळीच परगावी गेले आहेत संगीताने सांगितले. आम्हाला माहिती आहे. कंपनीच्या कामासाठी ते कोल्हापूरला स्विफ्ट या मोटारीने गेले आहेत. त्याच्या गाडीचा नंबरही आम्हाला पाठ आहे. परवा रात्री नऊ वाजेपर्यंत ते घरी येणार आहेत टोपीवाल्याने माहिती पुरवली.
माझ्या सासूबाईंनी तुम्हाला ओळखलं असतं. त्यांचं पण माहेर आमचंच गाव आहे. पण नेमक्या त्याही आज घरी नाहीत संगीताने माहिती पुरवली. शिरूरला तुमच्या नणंदेकडे त्या गेल्या आहेत. नणंदेचं दुसरं बाळंतपण गेल्याच आठवड्यात झालंय. त्यांची चिमुकली परी फार गोंडस आहे दाढीवाल्याने म्हटले.
तुम्हाला एवढी अपडेट माहिती कशी काय? संगीताने आश्चर्यानं विचारले. अशा माहितीच्या जोरावरच तर आमच्या बिझनेसची बिल्डिंग उभी आहे… दाढीवाल्याने हसत उत्तर दिले. असं म्हणून त्याने सुषमाच्या गळ्याला चाकू लावला.
घरात जेवढी रोकड आणि दागिने असतील, तेवढे मुकाट्याने आणून दे! दाढीवाल्याने असं म्हटल्यावर तिला घाम फुटला. तिने पैसे आणि दागिने त्यांच्या हातात दिले. तुझ्या वाढदिवसाला नवऱ्याने दिलेला हिऱ्याचा हार कोठंय? तो दे! टोपीवाल्याने दरडावून म्हटले. त्यानंतर तिने तोही दिला. तुझ्या धाकट्या भावाने रक्षाबंधनाला दिलेला ‘आयफोन- १३’ दे! दाढीवाल्याने म्हटले. संगीताने तो फोनही देऊन टाकला.
या दागिन्यांमध्ये राणीहार दिसत नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी तो घातला होता. तो कोठाय? तिसऱ्याने आवाज चढवत विचारले. संगीताने कपाटातून काढून तोही दिला. जेजुरीला जाताना पंचवीस हजारांची पैठणी नेसली होतीस. ती पण दे! टोपीवाल्याने दरडावले. ती दिल्यानंतर संगीताला रडू यायला लागलं. सासूबाई आणि नणंदेला अंधारात ठेवून, एवढ्या वर्षात आपण दागदागिने व मौल्यवान वस्तू करून ठेवल्या होत्या. एका क्षणात त्याचं होत्याचं नव्हतं झालं होतं.
माझ्याकडचा सगळा पैसा अडका, सोनं नाणं तुम्ही लुटलंत पण माझ्या घरातील एवढी सविस्तर माहिती तुम्ही कशी मिळवलीत? संगीताने विचारलं. तायडे, आम्ही सगळे तुझे फेसबुक फ्रेंड आहोत… तिघांनीही एका सुरात उत्तर दिले. 👆🏻 जरुर बोध घ्यावा.
संत वामनभाऊ महाराज (जन्म – १ जानेवारी, इ.स. १८९१ मृत्यू – २४ जानेवारी, इ.स. १९७६) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी संत आणि कीर्तनकार होते. संत वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिध्दपुरुष, साक्षात्कारी संत होते.
संत वामानभाऊंच्या आईचे नाव राईबाई,व पित्याचे नाव तोलाजी होते.या आनंदी व सात्विक दाम्पत्याच्या पोटी दैवरूपी संत वामानभाऊंचा जन्म झाला.1जुलै 1891साली श्रावण शुद्ध सोमवारी बाळ वामन भाऊंचा जन्म झाला. त्यांचा जन्म झाल्यानंतर सर्व परिसरामध्ये आनंद व चैतन्य निर्माण झाले.ज्याप्रमाणे दुष्काळी भागामध्ये पाऊस पडल्यानंतर बहर येतो,त्याप्रमाणे भाऊंच्या जन्मानंतर फुलसांगवी गावामध्ये घरोघरी आनंदाचे दिवे पेटले होते.निसर्गाच्या चारचरामध्ये एक सुर्यकिरणाचा सडा पडला सुर्यदेवताने पाडला होता. शुद्ध बिजपोटी, फळे रसाळगोमटी या संत तुकारामाच्या उक्तीप्रमाणे सोनवणे कुटुंबाच्या पवित्र कुळामध्ये संत वामानभाऊ चा जन्म झाला. वामानभाऊ चे अंतःकरण अतिशय कोमल होते,तसेच ते अत्यंत रागीट व कडकही होते.त्यांच्या वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द सत्य होत असे.त्यांच्या विषयी चा एक अनुभव मांडायचा झाला तर तो असा-वामानभाऊ दिंडीमधल्या एका व्यक्तीवर काही कारणाने रागावले तर ती व्यक्ती दिंडीतच पण थोडी बाजूला चालू लागली ,वामानभाऊंना हे जाणवलं त्यांनी त्याला बोलावून घेतलं व दुसऱ्या माणसाजवळ आमच्या दोघांच्या जेवणाची व्यवस्ता करा .आम्ही सोबत जेवू तो नाही जेवला तर मी पण उपाशी राहील अस वामानभाऊ म्हटले.अतिशय मायाळू वृत्ती होती वामानभाऊंची. माणसांनी माणसासारखं वागावं,गहिनीनाथ गडाच्या परिसराचं नव्हे अवघ्या महाराष्ट्र च सोन संत वामानभाऊ ,भगवानबाबा अशा थोर संतांनी केलं.परिसराची अवघी पंढरी संत वामानभाऊ भगवानबाबांनी केली.संत वामानभाऊ नाव घेतलं तर संकट टळत, जर भाऊंची सेवा करत राहील तर तुमच्यावर कसलच संकट जवळ येणार नाही.अशा थोर महात्म्याचा महिमा थोर आहे.
त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित केले होते. वामनभाऊ महाराज यांनी अध्यात्मातून अठरा पगड जातींच्या लोकांमध्ये चांगल्या विचारांची पेरणी केली. त्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचे शिकविले आणि चालू असलेल्या अनिष्ट रूढी, चुकीच्या परंपरा व अंधश्रद्धा बंद करण्याचा उपदेश केला. भाऊंना प्रत्यक्ष पाहिलेले, त्यांचे अनुभव घेतलेले असंख्य लोक आजही हयात आहेत, त्यांचा शिष्यगण, त्यांनी घडवलेले अनेक कीर्तनकार, टाळकरी, वारकरी गहिनीनाथ गड येथे या महात्म्याच्या पुण्यतिथीला न चुकता हजेरी लावतात. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक व सर्व क्षेत्रातील लाखो, आबालवृद्ध भक्त येथे ‘भाऊंच्या’ समाधीच्या दर्शनाला येतात.
माता राहीबाई भाग्याची खाण । पिता तोलाजी हा पुण्यवान ।। पुत्र जन्माला रत्नासमान । तयासी शोभे नाव वामन ॥ फुलसांगवी, ता.शिरूर (कासार), जि. बीड येथील तोलाजी ग्यानबा सोनावणे व बोरगाव (चकला) ता. गेवराई जि. बीड चे विठोबा राख यांच्या कन्या राहीबाई यांचा विवाह झाला. वंजारी समाजातील या पुण्यवान माता-पित्याच्या पोटी सदगुरू संत वामनभाऊ महाराज यांनीं जन्म घेतला. त्यांना जेष्ठ बंधू नारायन हे होते. माता राहीबाई या जुन्या प्रथेप्रमाणे बाळंतपणासाठी माहेरी बोरगावला गेल्या होत्या. सन १८९१ साली श्रावण शुद्ध सोमवारी सूर्योदय समयी त्यांनी या रत्नाला जन्म दिला. नाव ठेवले, वामन. ‘भाऊ’ हे भगवान शंकराचा अवतार मानले जातात. माता राहीबाई यांच्या पोटी प्रत्यक्ष देवाने जन्म घेतला.
हे त्याचे भाग्य थोर असले तरी.नियतीला काही वेगळेच घडवायचे होते. भाऊंचे संगोपन त्या माउलीच्या नशिबी नव्हते. भाऊंच्या जन्मानंतर अवघ्या ४० दिवसानंतर माता राहीबाई यांना देवाज्ञा झाली. मातेचे प्रेम या बाळाला मिळाले नाही. पूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाळाचे संगोपन कसे करायचे हा प्रश्न त्यंच्या पुढे उभा होता. राहीबाईने त्यांची आई आबाबाई यांना दृष्टांत दिला व सांगितले ‘आई आता तूच माझ्या बाळाची आई हो. तूच माझ्या वामनचा सांभाळ कर.’ आबाबाई सकाळी झोपेतून उठल्या त्यांनी बाळाला जवळ घेतले आणि चमत्कार झाला. नातवासाठी आजीला पान्हा फुटला. या आजीनेच भाऊंना लहानचे मोठे केले.
संत वामनभाऊ जीवन संपूर्ण जीवन वारकरी सांप्रदायाला समर्पित करणारे वैराग्य मूर्ती संत वामनभाऊ महाराज. डोंगर दऱ्यातून पायपीट करून या महात्म्याने भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकवली. ‘भाऊ ‘ हे अतिशय कडक स्वभावाचे होते. असे म्हटले जाते. परंतु चोरी करायला आलेल्या चोरांनाही त्यांनी जेऊ घातले होते. या महात्म्याचा हाच एक प्रसंग. पौष् वद्य ७/८ हा संत वामनभाऊंच्या पुण्य स्मरणाचा दिवस. ‘भाऊ ‘ श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत यादवबाबा यांचे उत्तराधिकारी झाले. यानंतर त्यांनी वारकरी सांप्रदायाचे कार्य सुरु केले.
आजीवन ब्रह्मचार्यव्रत व त्यागी वृत्तीमुळे त्यांची परिसरात ख्याती होती. वाचासिद्धी प्राप्त असलेल्या या साधूने कधीही महिलांना पायावर दर्शन दिले नाही. महिलांना त्यांचे दुरूनच दर्शन घ्यावे लागे.आजही त्यांच्या समाधीचे दर्शन महिलांना बाहेरूनच घ्यावे लागते. भाऊंचा स्वभाव कडक होता व ते रागात काही बोलून गेले तर ते सत्य होत असे. म्हणून बरेच लोक त्यांच्या जवळ जायला घाबरत होते. मात्र त्यांच्या शब्दाने असंख्य भक्तांचे कल्याणही झाल्याचे अनेक उदाहरणे समाजात आहेत. वयाच्या १२ व्या वर्षी भाऊंकडे दाखल झालेले धामनगावचे रघुनाथ महाराज चौधरी भाऊंचे अनेक प्रसंग आपल्या कीर्तनात आवर्जून सांगतात
श्री क्षेत्र गहिनीनाथ स्क्यूआज ज्या ठिकाणी श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे बांधकाम आहे त्याच ठिकाणी पूर्वी मोजके बांधकाम झालेले होते.
म्हणजे पत्र्याचा निवारा होता. श्रावण महिन्यातील दिवस होते.
रात्रीची वेळ रिमझिम पाऊस येत होता. गडावर सर्वत्र भक्त झोपलेले होते.
वामनभाऊंना जाग आली व ते हातात कंदील घेवून बाहेर आले.
सध्या यादवबाबा व खंडुबाबांची समाधी आहे त्याच्या मागच्या बाजूला एक छोटा नाला आहे.
त्या नाल्यात कोणीतरी लपल्याची चाहूल बाबांना लागली आणि ते आत आले.
त्यांनी आपले शिष्य दगडूबा व किसानबा यांना आवाज दिला.
ते सहसा त्यांना एकेरीने हाक मारायचे त्याप्रमाणे भाऊ म्हणाले ‘किसन्या…. दगड्या उठा, जागे आहेत का झोपलेत,
का मेलेत… उठा ‘ भाऊंचे शब्द कानी पडताच ते दोघे उठले व काय बाबा काय झाले ?
असे त्यांनी विचारले त्यावेळी त्यांना बाबांनी बाहेर कोणीतरी माणसे लपलेले दिसत आहेत, जाऊन पहाबर असे सांगितले .
दगडूबा हे शरीराने धष्टपुष्ट पण भित्र्या स्वभावाचे होते,
किसानबा हे किरकोळ पण धाडसी होते.
भाऊंच्या आदेशाप्रमाणे ते दोघे तेथे गेले आणि थेट त्या लपलेल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांची चौकशी केली
व तुम्हाला बाबांनी बोलावले असे सांगितले.
भाऊंचा आदेश त्या चोरांनाही मोडता आला नाही.
ही सर्वमंडळी भाऊंच्या समोर आली त्या वेळी भाऊंनी प्रश्न केला, तुम्ही कोण..कुठले आणि येथे काय करता ?
त्यावर त्यांना खोटे बोलण्याचे धाडस न झाल्याने त्यांनी आपण बीडसांगवीचे असून चोरी करायला आलो असल्याचे सांगितले.
घरी गेल्या आठ दिवसांपासून खायला दाणा नाही व लेकरबाळ उपाशी आहेत,
त्यामुळे आम्ही चोरी करायला आल्याचे त्यांनी सांगितले. भाऊंना त्यांची दया आली.
त्या चोरांना भाऊ म्हणाले ‘आता तुम्ही जेवण करून येथेच आराम करा’.
त्यांना पोटभर जेऊ घातले व सकाळी प्रत्येकाला झेपेल एवढे धान्य सोबत दिले व त्या चोरांना घरी जाण्याची परवानगी दिली.
परिणाम असा झाला की,
या चारही चोरांनी पुढच्या एकादशीच्या वारीला भाऊंच्या हाताने तुळशीची माळ घातली व चोरी करण्याचे कायमचे सोडून दिले.
“राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून…”, सावरकरांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून एकनाथ शिंदेंची टीका राहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात टीका केली.
“हिंमत असेल तर…” विधानसभेत कॅगचा अहवाल वाचणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज विधानसभेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरील कॅग चौकशी अहवाल वाचून दाखवला.
एअर इंडियानंतर आता अकासा घेणार उंच भरारी, हजारो हातांना देणार रोजगार नवीन एअरलाइन्स Akasa Air देखील उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यांनी शेकडो नवीन विमानांची ऑर्डर देण्याबरोबरच कंपनी १,००० जणांची भरतीही करणार आहे.
“कोणीतरी टाकलेल्या घाणीतूनही…” पतीच्या आत्महत्येनंतर सावरणाऱ्या मयुरी देशमुखची ‘ती’ पोस्ट चर्चेत मयुरी देशमुखच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर केरळ काँग्रेस वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी सज्ज काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर केरळमध्ये काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन यांनी सांगितले की, आम्ही वायनाडच्या पोटनिवडणुकीसाठी सज्ज आहोत.
राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कल्याणमध्ये काँग्रेसचा मोर्चा राहुल गांधी यांची खासदरकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि रद्द केलेली खासदारकी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसतर्फे शनिवारी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
भर उन्हाळ्यात संततधार!, चंद्रपूर जिल्ह्याला झोडपले शहर तथा जिल्ह्यातील काही भागात दुपारी एक वाजतापासून संततधार पाऊस सुरू आहे.
‘भीड’ चित्रपटाला वादाचा फटका; प्रेक्षकांनी फिरवली पाठ, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ लाख अनुभव सिन्हा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे
यमस्य करूणा नास्ती:! भूकेलेल्याला त्याच्या ताटावरून, तहानलेल्याला पाण्याचा ग्लास सोडून, शृंगारक्रीडा करणा-याला शयन मंदिरातून, शल्यकर्म चालू असता बेडवरून उचलले जाते. मृत्यूघटिका टळल्याचे आख्ख्या जगात एक उदाहरण नाही.
मग आपल्याला नेतात कुठे? हा विचार करणारे फार थोडे. लंडन, अमेरिकेला जाताना पौंड्स, डाॅलर्स इ.तिथल्या करन्सीची व्यवस्था केली जाते. पण मृत्यूनंतर आपण जेथे जाणार आहोत तेथील अज्ञात परलोकात “पुण्य करन्सी” महत्वाची असते ती जिवंतपणीच जमा करायची असते!
ही जाणीव वृद्धापकाळ आला तरी होत नाही.आपण अमरपट्टा घेऊन आल्याची गैरसमजूत असते.99 व्या वर्षी 99 वर्षाच्या कराराने जमीन खरेदी करतो आणि सही करतो तोच मृत्यू गाठतो.
दागदागिने आणि कॅश लाॅकर मध्येच रहाते, गुरे गोठ्यात रहातात.बरोबर काहीच नेता येत नाही! तरी जीव नश्वराच्याच मागे लागतो! अजगर बेडकाला गिळत असतो आणि बेडुक माशा पकडण्यात रंगून जातो. असेच आपले आहे.
आपण प्रपंचीत मोहपाशात अडकून बसलेलो आहोत! सहस्त्र चंद्रदर्शन झालेले राजकारणी पुढील गतीची तयारी न करता नवीन पक्ष काढून राजकारण खेळतात! कलावंत करोडो रुपये कमवूनही दहा मिनिटेही परमेश्वराला न देता पैशासाठी परदेश दौरे करतात.
भक्ती बर्वे, पद्मा चव्हाण, मॅरिलीन मनरो, जयश्री गडकर, गणेश भालेराव यांची काय जाण्याची वये होती का? पण यमाग्रजाने वाॅरंटच काढले होते. आपल्या बरोबर फक्त शुभाशुभ कर्मेच येतात! या व्यस्त कलावंताना कुठे वेळ होता पुण्य संचयासाठी?
म्हणून श्रीगुरूचरित्र ग्रंथात महाराज सांगतात की वय तरूण असतानाच पुण्यसंचय करून ठेवा कारण जीविताचा भरवसा नाही!
ते मातुःश्रींना म्हणाले! “आई तू मला सांगतेस की अग्राह्यसंन्यास बालपणी घेऊ नको!वानप्रस्थाना नंतर संन्यास घ्यावा! पण आई मला तेवढे आयुष्य आहे याची खात्री तुला आहे का?
“मातुःश्री निरुत्तर झाल्या. प्रपंचा बरोबरच आध्यात्मही जवळ केले म्हणजे तरच ज्ञान व सुरक्षितता लाभते! नाही भरवसा या घडीचा रे अभिमान धरीसी कोणाचा?
यासाठी भंगवताला प्रेम, भक्ती द्या. मग तो तुमच्या आवडीचा देव,संत कोणीही चालेल पण संत, गुरु, देव एकच पाहिजे! अनेक नकोत! तुमची श्रद्धा, भाव फक्त आणि फक्त त्या एकवरच पाहिजे!
हरि नामाच्या बँकेमध्ये आपल्या आवडत्या देवाच्या नामाचे धन करा जमा…! तेच हरीनाम जमा शेवटी येईल तुमच्या कामा !🚩
(1). = कोणत्याही धार्मिक ठिकाणी ग्रंथ भेट करा , जेव्हा कोणी त्याचे वाचन करेल तेव्हा पुण्य तुम्हाला लागेल…
(2). = एक व्हील चेयर , कोणत्याही हॉस्पिटल मध्ये दान करा, जेव्हा कोणताही रुग्ण त्याचा उपयोग करेल , पुण्य तुम्हाला मिळेल…
(3). = कोणत्याही अन्नक्षेत्रासाठी, मासिक ब्याज वाली एफ. डी बनवा, जेव्हा त्याच्या व्याजा पासून कोणी जेवण करेल पुण्य तुम्हाला लागेल सार्वजनिक ठिकाणी अन्नदान करा…
(4). = कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाटर कुलर लावा , नेहमी पुण्य मिळेल…
(5). = कोण्या अनाथला शिक्षित करा, तो आणि त्याची येणारी पिढीही तुमच्या सुखाची प्रार्थना करेल , तर पुण्य तुम्हाला मिळेल…
(6). = तुमच्या मुलांना परोपकारी बनवू शकाल तर , सदैव पुण्य मिळत राहील…
( 7). = सर्वात सोपी आहे की ह्या गोष्टी तुम्ही दुसऱ्यांना सांगा एकाने जरी या पैकी एक गोष्ट पूर्ण केली तर पुण्य तुम्हाला लागेल…
🔺 सर्वात पहिले सेंड करा कारण जो पर्यंत कोणी हा MSG वाचत राहील, तुमच्या नावाचे पुण्याचे झाड लागत राहतील आणि तुम्हाला फळ मिळत राहील , म्हणूनच बोलतोय थांबू नका , निरंतर चालू राहा…
💁♂️ 📢दवंडी डिजिटल🪀 मॅगझीन वर खालील माहिती मिळेल 👇
📻ब्रेकिंग न्यूज 💰बँकिंग क्षेत्रातील अपडेट 🌎जॉब अपडेट (online wfh) 👨🏻✈️सरकारी नोकरी विषयी माहिती 📊शेअर मार्केट विषयी अपडेट 🌱सर्व शेतकरी योजना माहिती 🌎सर्व ऑनलाईन योजना माहिती 👨🏻🏫विद्यार्थ्यांसाठी नवीन करिअर मार्गदर्शन 📝सर्व ऑनलाईन फॉर्म भरण्याची माहिती
💁🏻♂️ या 📢दवंडी मॅगझीन वर आपल्या 🏡घरातील प्रत्येकासाठी महत्वाचे अपडेट राहतात – चांगल्या अपडेट साठी आजच जॉईन करा*👇 💁🏻♂️ 📢दवंडी मॅगझीन जॉईन करा👇 👉 [ http://davandi.in ] ]